आरमारप्रमुख सुभेदार मायनाक भंडारी उर्फ मायाजी नाईक भाटकर
त्याचप्रमाणें धुळपांच्या अधिकाराखालीं दामाजी नाईक कुवेसकर, शिवाजीराव सुर्वे, विठोजी नाईक बांवकर, अनाजी नाईक बोरकर, रायाजी नाईक बोरकर, गणोजी नाईक भाटकर, विठोजी नाईक पनळेकर, गोविंदराम बाबूराव सांळुख्ये व दरजी नाईक पाटील (१७६० ते १७९०) वगैरे सरदार भंडारी ज्ञातीचे होते. करवीर दरबारच्या मालवणच्या सरदारांत दादाजी नाईक तोंडवळकर हे भंडारी सरदार प्रमुख होते (१७८१ ते १७८२).त्याचबरोबर हेटकरी ही तुकडी देखील भंडारीच होती.त्यात देखील बरेच सरदार होऊन गेलेत. ९०% भंडारी समाज त्याकाळी आरमारी व सैनिकी पेश्या मध्ये होता.भंडारी मिलीशिया हे १६८९ मध्ये भंडारी तरुणांद्वारे स्थापित पोलीस दल शिवकाळापूर्वी देखील काही भंडार्यांनी स्वतंत्र राज्ये देखील उभारलेली होतीत.भोंगळे,शेषवंशी,शेटये इ मुंबईवर राज्य करणारे राजवंश देखील भंडारीच .कोकण व गोमंतकात १५ व्या शतकात भंडार्यांनी कोकणात व गोमंतकात राज्ये स्थापून राहिले होते व त्यांनी प्रदिर्घ काळ मुस्लिम आक्रमणकारी लोकांना प्रतिकार केला. विजयनगर साम्राज्यात देखील त्यांचा मोठा समावेश होता.ते नायक होते विजयनगर साम्राज्यात.त्याआधीदेखील शिलाहार,भोज,मौर्य काळात देखील ते अस्तित्वात होते.कारण ते मूळात क्षत्रियच होतेत.